बदलत्या ऋतू सोबत

बदलत्या ऋतू सोबत मीही बदलत गेले ,

कधी जगायची तू सोबत आहेस म्हणून ,

आता जगतेय तू सोडून गेलास म्हणून ......

तुझे जाने अकारण नव्हते ,

पण तुला विसरनेही मज सकारण होते ,

कारणाला कारण मिळत गेले ,

अन आपल्याला दुराव्याचे पंख फुटत गेले ,

सुरेख स्वप्नांना लागावी दृष्ट ,

अशी आपली सलोख्याची घरं तुटली ,

दृढ विश्वासाचे पेरले होते बीज ,

पण ती जमीनहि वांझोटी होती ......


कवयित्री - अर्चना सोनाग्रे

Comments

Popular Posts