म्रुत्यू!

शरीर नश्वर आहे हो हे
त्यात गुरफटून जाउ नको

लाड पुरवन्याच्या नादात ह्याचे
माणुसकीला विसरु नको

म्रुत्यू हा अटळ आहे
तो आपल्या गुणधर्माला जागेलच

कितिही केला आटा पिटा
तरीहि शरिर मातित मिळेलच

आलेला क्षण जगुन घ्यावे
इतरान्नाहि जगु द्यावे

इच्छांच्या व्यापात मानवतेलाहि जागा दे
आपल्या स्वार्थापोटि मन कुणाचे दुखवु नये
वड्याचे तेल वांग्यावर , असा प्रकार करु नये

मृत्यु म्हणजे अंत नाहि
फक्त क्षण भराची विश्रांती

परत फिरुनि इथेच यावे
केलेल्या कर्माचे भोग भोगावे .....


Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts