मज स्वातंत्र्य जाहले

किती म्रुत्युमुखि पडले
कितिन्नी हसत हसत मरण स्विकारले

अशे किती प्राणाला मुकले
तेव्हा मज स्वातंत्र्य जाहले

मि कधी बोलली नाही
नाही कधी कुण कुण केली
तरिही अबोल प्रार्थना ते समजुन गेले
मज स्वतंत्र जे करुन गेले

किती विटम्बना मि पाहिली
पाउस पाण्यात वाहुन गेली
परी उरी दाटुन आली इच्छा
मज स्वातंत्र्य मिळावी अशी

अन क्रांतिची ज्योत पेटली
मात्रुभुमिला मुक्त कराया सेना उठली
शत्रुने खुप डाव मांडले
किती चाली चालल्या

मतभेदाचे रोप रुजवले
भावा भावात युध्द पेटले
अखेर न व्ह्यायचे ते झाले
एका ममतेचे दोन तुकडे झाले

स्वातंत्र्य माझ्या पदरी पडले
पण तेव्हा पदराचे विभाजन झाले होते
अनेक घावान्नी ते स्वातंत्र्य नटले...

आजही उर दाटुन येतो
अश्रुंचा पाट वाहु लागतो
जेव्हा रक्ताचा तो सडा आठवतो ...

माझ्या स्वातंत्र्याची असेल हि किम्मत
मला जर असती किंचीतहि खबर
मि स्वातंत्र्याचि आस ना केली असती ...

Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments

Popular Posts